बुलढाणा अपडेट ( प्रतिनिधी)अनिल राठोड डोणगाव:दि१९ फेब्रुवारी, संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. जगभरात हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होत असताना, डोणगाव येथे मात्र केवळ गाजावाजा न करता ‘रयतेच्या राजा’चे विचार कृतीत उतरवणारी आगळीवेगळी शिवजयंती साजरी करण्यात आली. युवा नेते अमोल धोटे यांच्या पुढाकाराने गावातील गरजू माता-भगिनींना साडी-चोळीचे वाटप करून महाराजांना खऱ्या अर्थाने मानवंदना देण्यात आली. केवळ उत्सव नाही, तर समाजसेवा!सध्याच्या काळात शिवजयंती साजरी करताना अनेकदा मूळ विचारांचा विसर पडतो. हीच बाब लक्षात घेऊन, डोणगाव येथील तरुण तडफदार नेतृत्व अमोल धोटे यांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचा निर्णय घेतला. शिवरायांनी आयुष्यभर सामान्य जनतेचे आणि महिलांचे रक्षण केले, तोच वारसा पुढे चालवत आज गावातील शेकडो महिलांना साडी-चोळी भेट देण्यात आली. या मदतीमुळे उपस्थित प्रत्येक माता-भगिनीच्या चेहऱ्यावर समाधानाचे आणि आनंदाचे हास्य पाहायला मिळाले.
केवळ मिरवणुका न काढता, समाजातील उपेक्षित आणि गरजू घटकांसाठी राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे संपूर्ण परिसरात कौतुक होत आहे. “महाराजांच्या विचारांची हीच खरी जयंती आहे,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.या सोहळ्याप्रसंगी उपस्थित मान्यवर:या कार्यक्रमाला युवा नेते अमोल धोटे यांच्यासह निलेश सदावर्ते, जुबेर भाई शेख आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तरुणांनी परिश्रम घेतले.”छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले. त्यांच्या जयंतीनिमित्त आपल्या भागातील माता-भगिनींचा सन्मान करणे, हे आमचे भाग्य आहे. शिवरायांचे विचार घराघरात पोहोचावेत हाच आमचा प्रामाणिक उद्देश आहे.”





